सर्वच जण मारतात,
मूकपणाने आरोळी..
त्याचीच मग होते,
माझी चारोळी..
शब्द तेच वाक्य तेच,
संदर्भ का बदलायचे..
कल्पनेतल्या विश्वाला,
थोडेसे वास्तवात येवू द्यायचे..
मनातलं कुणालाच
सांगता येत नाही..
म्हणून तर कुणाशीच,
भांडता येत नाही..
संवेदना जाणवण्याची,
मला चांगलीच शिक्षा आहे..
प्रत्येक क्षणात द्यावी लागते,
मला एक परीक्षा आहे..
No comments:
Post a Comment