Tuesday, May 24, 2011


प्रत्येकास हवी असते
एक सावली
विसावा घ्यायला,
एकांताच्या कातरवेळी
मनी मारवा गायला..




कुठून येतो हा आठ्वणींचा  मोहोर
फुलतो कसा हा मनातील गुलमोहोर 
यावी वाटे आता एकतरी  पावसाची सर
सहन होत नाही हा ग्रीष्माचा कहर..

Monday, May 23, 2011

जीवनाच कोडं म्हणतात
असं एक कोडं असतं
त्याच्या प्रश्नाचं उत्तर
प्रश्नातच सापडत असतं..


आठवणींची गरजच नसते 
जेव्हा आठवणच आठव असते
कशाला बहाणा करावा उगीचच
विस्मृतीत काही जातच नसते..


सवय झाली मला आता 
मुकं मुकं राहण्याची
बोलायचं असतं मनातलं जेव्हा 
वेगळचं बोलून जाण्याची..


माझी प्रेम भावना 
मी अशीच अबोल ठेवीन 
तुला कळली तर ठीक 
नाहीतर चोरकप्प्यात दडवून ठेवीन..    
 


कल्पनेच्या चांदण्यात मी
तशीच धूसर उभी राहीन
तू नाहीच आलास तर 
धुक्यासारखी विरून जाईन.. 


तुला हवी असते मी 
तुझी सावली म्हणून ,
कडक ऊन पडताच
निमूटपणे सोबत येणारी 
एक बाहुली म्हणून..  

Tuesday, May 17, 2011

दुनियेच्या पसार्यात तुला,
 माझी आठवण येणार नाही..
एकांतात असतांना मात्र,
माझ्याशिवाय पसाराच होणार नाही..


प्रेम उमगण्यासाठी स्वत:ला,
मृत्युच्या मुशीत लोटाव लागत..
कण कण झिजून स्वत:,
दुसर्यासाठी जगावं लागत..


बेधुंदीचे ते क्षण,
धुंद होवून गेले..
मनाच्या चोर कप्प्यात,
ठेव ठेवून गेले..


तुला काय हवय हे,
तुलाही कळत नाही.. 
मला कळलं तरीही,
मी ते तुला कळवत नाही..    
     

Tuesday, May 3, 2011

मी माझ्या अंगणात
 झाड लावले आनंदाचे
त्याची फुले,
 तुझ्या दारात पडणार  आहे..

सुगंध भरभरून हुंगून घे
त्या फुलांचा
कारण त्यात प्रेमाचाच,
श्वास असणार आहे..

तुझ्या मनाचे फुलपाखरू,
चटकन एका फुलावरून
दुसर्या फुलावर उडून गेले..
तेव्हाच माझे फुलासारखे मन,
पाकळ्या झडून झडून
निर्माल्य झाले..