दुनियेच्या पसार्यात तुला,
माझी आठवण येणार नाही..
एकांतात असतांना मात्र,
माझ्याशिवाय पसाराच होणार नाही..
प्रेम उमगण्यासाठी स्वत:ला,
मृत्युच्या मुशीत लोटाव लागत..
कण कण झिजून स्वत:,
दुसर्यासाठी जगावं लागत..
बेधुंदीचे ते क्षण,
धुंद होवून गेले..
मनाच्या चोर कप्प्यात,
ठेव ठेवून गेले..
तुला काय हवय हे,
तुलाही कळत नाही..
मला कळलं तरीही,
मी ते तुला कळवत नाही..
No comments:
Post a Comment