Monday, November 14, 2011

कशाला हवी ती धडपड
कशाला हवा तो प्रवास
रोखून धरावा आता श्वास
संपवावा एकदाचा वनवास..



कोणतीही नशा
ही शेवटी नशाच
ओसरली की उमगते
झालेली स्वत:ची दुर्दशा..


कितीही केला आयुष्यभर प्रयास
तरी एक अधिक एक होतच नाही
एकातून एक वजा होऊन श्युन्य कधी उरतो
हे आपलचं आपल्याला कळत नाही..


मृत्यूलाही असं कवटाळावं 
राखेचाही भार न राहावा 
निमुटपणे निघून जावं 
कोणताही करार न उरावा.. 

No comments:

Post a Comment